महाराष्ट्र पोरका झाला. बाळासाहे ब ठाकरे नावाचे वादळ शिवतीर्था च्या कुशीत विसावले . तब्बल २० लाख लोकांचा जनसमुदाय ह्या पराक्रमी व्यक्तिमत्वाचे दर्शन घ्यायला शिवतीर्था वर येतो हा एक चमत्कार आहे . युगपुरूषाने मतृ ्वयू र विजय मिळवला हे च तो दर्शवतो. एक महाशक्ती अनंतात विलीन झाली. एकीकडे साहे बांनी उभारलेल्या मराठी अस्मितेचा विशाल गढ त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देत होता तर दुसरीकडे , इतिहासातील पराक्रमाची आठवण देत ‘गढ आला पण सिंह गेला’ हा भाव लोकांचे अश्रू थांबवत नव्हता ! शिवतीर्था वर जमा झालेला अफाट जनसागर ह्याच गोष्टीची साक्ष देत होता की , “साहेब गेले नाहीत, जाणारही नाहीत ते आमच्या हृदयात शेवटपर्यंत जिवंत असणार आहेत.” मराठी मनाला एकत्र आणणारा, मराठी माणसांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा राजा गेला. त्यांच्या दिवंगत आत्म्यास चिरशांती लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थ ना! हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. श्री. बाळासाहे ब ठाकरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
पू र्व गं ध २ ० १ २ 7