Latest Solapur News In Marathi

Page 1

बालदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा! दैिनक ¼ समूहाचे मराठी वृत्तपत्र

एकूण पाने १२+४+८=२४। किंमत ‌~३.००

सोलापूर

न्यूज इनबॉक्स

शुक्रवार, १४ नाेव्हेंबर २०१४

श्रीलंका रोहितइतक्या धावाही करू शकली नाही, २५१ वर सर्वबाद

एकमेवाद्वितीय

द्विशतक

पेट्रोल-डिझेलवरील करात वाढ, दरांत नाही

२६४ धावा १७३ चेंडू ३३ चौकार ०९ षटकार

नवी दिल्ली | पेट्रोल-डिझेलवर उत्पादन शुल्क दीड रुपये प्रतिलिटरने वाढवण्यात आले आहे. तथापि, ग्राहकांना याचा कोणताही फटका बसणार नाही. शनिवारी दरांचा आढावाही घेतला जाणार नाही. शुल्क वाढवल्यामुळे सरकारला १३ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे.

चेतन भगतवर अब्रुनुकसानीचा खटला चालवण्याची शक्यता

पाटणा | बिहारच्या डुमरांव राजघराण्याने लेखक चेतन भगत यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करण्याचा इशारा दिला आहे. भगत यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या "हाफ गर्लफ्रेंड' पुस्तकाबद्दल वाद आहे. माजी महाराज बहादूर कमलसिंह आणि युवराज चंद्रविजय सिंह यांनी भगत यांच्यावर बदनामीचा आरोप केला आहे.

मोठी खेळी करणारा एकमेवाद्वितीय फलंदाज

5 विक्रम

1

दोन द्विशतके : असे

कोणीही करू शकले नाही. यापूर्वी रोहितने २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध बंगळुरूत २०९ धावा ठोकल्या होत्या.

स्ट्राइक रेट

वनडेत आता ३०० धावाही शक्य

रोहितने २६४ धावांदरम्यान ५८ चेंडूंवर एकही धाव घेतली नाही. या चेंडूंवर धावा काढल्या असत्या तर तो ३०० पर्यंत पोहोचला असता. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन तर म्हणालाही, - रोहितचे वनडेत त्रिशतक हुकले यावर विश्वासच बसत नाही.

प्रत्येक ५० नंतर वेग वाढला

१८६

2 सर्वां: त मोठी खेळी

अजून ५० षटके खेळू शकलो असतो

3 सर्वाधिक चौकार :

धाव ा चेंडू चौकार षटकार पळून ०० ३० 1st ५० ७२ ०५ ०१ १६ 2nd ५० २८ ०७ ०२ १० 3rd ५० २५ ०७ ०२ १४ 4th ५० २६ ०६ ०३ ०४ 5th ५० १५ ०७ २५० नंतर उर्वरित १४ धावांपैकी ४ धावा पळून काढल्या.

4

४०० प्लसचाही विश्वविक्रम

रोहितने २६४ धावांची खेळी केली. यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा जेनने (महिला क्रिकेट) २२९,सेहवागने २१९ धावा फटकावल्या होत्या.

धावा चौकार, षटकारानेच पूर्ण

नवी दिल्ली | कौटुंबिक छळाच्या एका प्रकरणात पतीपासून विभक्त झालेल्या एका विक्षिप्त महिलेची पोटगीची मागणी दिल्लीतील न्यायालयाने फेटाळली. पोटगी ठरवताना ती देण्याची पतीची ऐपत आहे किंवा नाही हेदेखील बघितले पाहिजे​े, असेही न्यायालयाने म्हटले आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश अमित बन्सल यांनी न्यायदंडाधिकाऱ्यांचा आदेश कायम ठेवला. त्यात पतीची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय सुनावण्यात आला होता. पत्नीने त्यास आव्हान दिले हाेते.

कोलकाता|श्रीलंकेविरुद्ध चौथ्या वनडेत २७ वर्षांच्या रोहित शर्माने इतिहास रचला. १० आठवड्यांनी मैदानात उतरलेल्या रोहितने २६४ धावा कुटल्या. हे त्याचे दुसरे द्विशतक आहे. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ २५१ धावांतच सर्वबाद झाला. भारत १५३ धावांनी जिंकला. म्हणजेच एकट्या रोहितच्या तुलनेत श्रीलंकेला १३ धावा कमी पडल्या.

रोहित शर्मा वनडेत दुसरे द्विशतक आणि सर्वात

१५२.६०

पोटगी ठरवत असताना पतीची ऐपतही पाहावी

दहशतवादाला धर्माशी जोडू नका : मोदी ११

रोहितने ३३ चौकार मारले. यापूर्वी सेहवाग आणि सचिनने {५१ ते २५० पर्यंत पोहोचण्यासाठी ९४ चेंडू. पहिल्या २५-२५ चौकार मारले होते. १०० धावा, १०० चेंडूंत, पुढील १५० धावा 66 चेंडूंत.

पहिल्या ते ५० व्या षटकाचा शेवटचा चेंडू खेळूनही थकल्यासारखे मला वाटत नव्हते. मी अजून सहजपणे आणखी ५० षटके खेळून काढली असती.

आशियाई देशाविरुद्ध पहिले द्विशतक: यापूर्वी

ऑस्ट्रेलिया (रोहित), वेस्ट इंडिज (सेहवाग), द. आफ्रिकेविरुद्ध (सचिन) द्विशतके ठोकली होती.

बाउंड्रीज 5 सर्वाधिक :

रोहितने १८६ धावा चौकार- षटकारांवरच ठोकल्या. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉटसन (१५० धावा) यांच्या नावे होता.

संबंधित. स्पोर्ट‌्स

टीम इंडियाने पाचव्यांदा वनडेत ४०० पेक्षा जास्त धावांचा पल्ला गाठला, हाही एक विक्रमच! द. आफ्रिका व श्रीलंका दोन वेळा ४०० पेक्षा धावा करून दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

२ योगायोगही {४ पैकी ३ द्विशतकी खेळीत (इंदूर,

ग्वाल्हेर व कोलकाता) भारत १५३ धावांनी विजयी झाला. {रोहितच्या दोन्ही द्विशतकादरम्यान विराट धावचीत झाला.

चारही द्विशतके भारताच्या नावे : सचिन

(२०१०), सेहवाग (२०११), रोहित (२०१३ आणि २०१४) अशी चारही द्विशतके भारतीय मैदानांवरच झाली आहेत.

फडणवीस सरकार बरखास्त करा सेनेची राज्यपालांकडे याचिका फेटाळली मागणी, मुख्यमंत्री दिल्लीत भाजप सरकार घटनाबाह्य विशेष प्रतिनिधी | मुंबई, नवी दिल्ली

फडणवीस सरकारने आवाजी मतदानाने सिद्ध केलेले बहुमत घटनाबाह्य असून हे सरकार बरखास्त करण्याची मागणी गुरुवारी शिवसेनेने राज्यपालांकडे केली. काँग्रेसही शुक्रवारी राज्यपालांना भेटणार आहे. विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने घटनेतील कलम १६४ नुसार फडणवीस सरकार घटनाबाह्य असल्याची तक्रार राज्यपालांकडे केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ शुक्रवारी राज्यपालांकडे

असल्याचा दावा करणारी भारिपबहुजन महासंघाचे नेते ज. वि. पवार यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. ९ नोव्हेंबरपूर्वी नवी विधानसभा अस्तित्वात येणे गरजेचे होते, परंतु १० नोव्हेंबरपासून नवीन आमदारांचा शपथविधी सुरू झाला, असा दावा याचिकेत होता.

पुन्हा विश्वास ठराव मांडण्याची मागणी करणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत दाखल झाले अाहेत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत ते पक्षश्रेष्ठींशी चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येते.

भाजपच्या चतुर खेळीत शिवसेनेचा ‘कार्यक्रम’

शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेनेशी वाटाघाटी सुरू ठेवून आवाजी मतदानाने विश्वास ठराव मंजूर करून घेणाऱ्या भाजपने शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद दिले खरे, परंतु आता शिवसेना आपल्या बाजूने राहणार की विरोध राहणार हे सिद्ध करण्यासाठी भाजप अनोखी खेळी करणार असल्याचे सांिगतले जात आहे. भाजपतील एका वरिष्ठ नेत्याने ‘दिव्य मराठी’शी बोलताना याबाबतचे सूतोवाच केले. त्यांच्या मते, आम्ही लवकरच राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या घोटाळ्यांची चौकशी करणार आहोत. त्या वेळेस राष्ट्रवादी आमच्यावर अविश्वास ठराव मांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेची कोंडी होईल, असे हा नेता म्हणाला.

ठरावावेळी शिवसेनेचे अामदार बाहेरच : मुख्यमंत्री बुधवारी विधानसभेत सरकारने विश्वास ठराव मांडला त्या वेळी शिवसेना नेत्यांमध्ये समन्वय दिसला नाही. त्यांचे सुमारे अर्धे अामदार सभागृहाबाहेर गेले हाेते, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या सुरात सूर मिसळला अाहे. बुधवारी शिवसेनेने प्रस्तावावर अाक्षेप घेतल्यानंतर लगेचच भुजबळांनी ठरावाच्या वेळी शिवसेना अामदारांनी सभात्याग केला हाेता, असा गाैप्यस्फाेट केला हाेता.

अन्न सुरक्षा : अरिष्ट टळले मुंबई क्राइम ब्रँचही शेतमालावरील सबसिडी सुरूच राहणार वृत्तसंस्था | नवी दिल्ली

भारतीय शेतकऱ्यांचे हित अबाधित ठेवून अन्न सुरक्षा मुद्द्यावरील मतभेद भारत आणि अमेरिकेने सोडवल्यामुळे जागतिक व्यापार संघटनेत (डब्ल्यूटीओ) व्यापार सुगमता कराराचा (टीएफए) मार्ग मोकळा झाला आहे. अन्नधान्याच्या साठवणुकीच्या मुद्द्यावर भारताच्या प्रस्तावाला पाठिंबा देण्याचे अमेरिकेने मान्य केले आहे. तो आता डब्ल्यूटीओच्या सर्वसाधारण परिषदेत पाठवला जाणार आहे. अन्न सुरक्षेबाबतचे भारत- अमेरिकेतील मतभेद संपुष्टात आले असल्याची घोषणा वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. अन्नधान्य सबसिडीच्या मुद्द्यावर कायमस्वरूपी तोडगा निघाल्याशिवाय टीएफएवर स्वाक्षरी करणार नाही, अशी भारताची भूमिका होती.ती आता अमेरिकेनेही मान्य केली आहे.

फायदा काय ?

‘पीस क्लॉज’ अर्थात बाली करारानुसार सदस्य देशांना २०१७ पर्यंतच अन्न सुरक्षा देण्याची मुभा आहे. म्हणजेच त्यानंतर भारतातील हमी भावाने शेतीमालाची खरेदी आणि अन्न सुरक्षा योजना बंद करावी लागली असती. कायम तोडगा निघेपर्यंत हा ‘पीस क्लॉज’ सुरू ठेवण्यास अमेरिका तयार झाली आहे.

तपासात सहभागी प्रतिनिधी |पाथर्डी

जवखेडे हत्याकांडाच्या तपासातील प्रगतीबाबत राज्य शासन व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गुरुवारी मुंबईत आढावा घेतला. तपास यंत्रणांमध्ये मुंबई क्राइम ब्रँचही सहभागी झाली आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या जवखेडे तिहेरी तपासाला गती देण्याचे आदेश हत्याकांड : एकाच्या मुख्यमंत्र्यांनीही दिले आहेत. नार्को चाचणीतून सध्या सहाजणांच्या नार्को व अन्य चाचण्या करण्याची प्रक्रिया नवी दिशा सुरू आहे. एकाची चाचणी होऊन पोलिसांना तपासाची नवी दिशा मिळाल्याचे समजते. मात्र, याबाबत तपास यंत्रणेकडून माहिती दिली जात नाही. १६ नोव्हेंबरपर्यंत सर्व सहाजणांच्या चाचण्या करण्याची विनंती पोलिसांनी केली. दरम्यान, जवखेडे येथे भेट देणाऱ्यांची संख्या आता रोडावली आहे. मृतांच्या कुटुंबीयांकडून ग्रामस्थांबाबत व्यक्त होणाऱ्या नाराजीतून आता वेगळे वळण घेऊन या वस्तीवर जाण्याचे टाळत तपास यंत्रणांच्या संपर्कात ग्रामस्थ आहेत.

फोटोसाठी झाडू मारणारे जातीयवादाचे िवषही पेरताहेत नेहरू जयंती कार्यक्रम

राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर घणाघाती टीका, वारशावरून पेटलेला संघर्षही झाला तीव्र

वृत्तसंस्था | नवी दिल्ली

काँग्रेस कोती : भाजप

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या वारशावरून पेटलेला संघर्ष तीव्र झाला आहे. काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर याच मुद्यावरून गुरुवारी टीकेची झोड उठवली. ‘एकीकडे फोटो काढण्यासाठी झाडू मारत आहेत आणि दुसरीकडे जातीयवादाचे विष पेरत आहेत’, अशा शब्दांत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींना लक्ष्य केले. नेहरूंची ‘उदारमतवादी भारता’ची संकल्पनाच मोडित काढण्याचा मोदींचा प्रयत्न असल्याची टीकाही काँग्रेसने केली. नेहरूंच्या १२५ व्या जयंतीनिमित्त दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर आयोजित कार्यक्रमात मोदींचे नाव न घेता राहुल म्हणाले की, ‘विद्वेषाची भावना असलेले लोक देशावर राज्य करत आहेत. इंग्रजी हद्दपार करा, आम्ही फक्त हिंदीतच कामकाज करू, असे ते म्हणतात.

पंडित नेहरूंच्या जयंतीनिमित्त देश आणि समाजाच्या ऐक्यावर चर्चा करायला हवी होती परंतु काँग्रेस तिरस्काराचे राजकारण करत आहे. पंडित नेहरू देशाचे नेते होते. मात्र काँग्रेस त्यांना पक्षापुरते मर्यादित करून त्यांची प्रतिमा खुजी करण्याचा प्रयत्न करत आहे, असे भाजपचे प्रवक्ते शहनवाज हुसेन म्हणाले.

वर्ष ३ } अंक २२४ } महानगर

दैिनक भास्कर समुह

नेहरूंच्या १२५ व्या जयंतीनिमित्त दिल्लीत आयोजित कार्यक्रमात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल, साेनिया गांधी अाणि माजी पंतप्रधान मनमाेहनसिंग. स्वातंत्र्यानंतर आम्ही असे केले असते तर आमचे तरुण आयआयटी, आयआयएम आणि परदेशात जाऊ शकले नसते. त्यांनी देश व जनतेला मोठमोठी आश्वासने दिली. मात्र केले काहीच नाही. फक्त लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न ते करत आहेत. समाजाची ठेवण खिळखिळी १४ राज्ये } ५८ आवृत्त्या

केली जात आहे, त्याचा जोरकसपणे प्रतिकार केला पाहिजे’. पंडित नेहरूंच्या विचारसरणीवर हल्ले चढवणाऱ्या, त्यांच्या स्वप्नातील भारताची संकल्पनाच उद्धवस्त करू पाहणाऱ्या लोकांविरूद्ध काँग्रेसला लढायचे आहे. देशाची

धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी रचना उदध्वस्त करण्याचा होत असलेला प्रयत्न हाणून पाडला पाहिजे, असे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी यावेळी सांगितले. महापुरुषांच्या वारशावरून संघर्ष : काँग्रेसने १७ आणि १८ नोव्हेंबर रोजी दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय संमेलनाचे आयोजन केले आहे. नितीश कुमार, ममता बॅनर्जींसह विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांना त्यासाठी निमंत्रित केले आहे. अनेक देशांतील नेतेही येणार आहेत. मात्र काँग्रेसने मोदींसह एकाही भाजप नेत्याला निमंत्रण दिले नाही. गांधी, नेहरू, सरदार वल्लभभाई पटेलांसह स्वातंत्र्य लढ्यातील अन्य नेत्यांच्या वारशावर मोदी डल्ला मारत असल्याशी त्याचा संबंध जोडला जात आहे. मोदी सरकारने नेहरूंची १२५ वी जयंती ‘बाल स्वच्छता वर्ष’म्हणून साजरी करण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमांना मोदी स्वत: हजर राहणार नाहीत.

मध्य प्रदेश }छत्तीसगड }राजस्थान }नवी दिल्ली }पंजाब }चंदिगड }हरियाणा }हिमाचल प्रदेश }उत्तराखंड }झारखंड }जम्मू-काश्मीर }बिहार

}गुजरात }महाराष्ट्र

}महाराष्ट्र

}मुंबई }बेंगळुरू }पुणे }अहमदाबाद (सुरत) }जयपूर

}७ राज्ये }१७ केंद्रे


Issuu converts static files into: digital portfolios, online yearbooks, online catalogs, digital photo albums and more. Sign up and create your flipbook.